Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

"अनाथ विशाखाला मिळाला आधार" "सचिन केंद्रे यांनी घेतली शिक्षणाची जबाबदारी" जळकोट | प्रतिनिधी डोंगर कोनाळी येथील कै. श्रीदेवी बालाजी गव्हाणे यांच्या दुःखद निधनानंतर पोरकी झालेल्या त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते *सचिन केंद्रे* यांनी स्वीकारली आहे. कै. श्रीदेवी यांचे 12 जून रोजी निधन झाले होते. त्यानंतर गव्हाणे कुटुंबाच्या सांत्वनासाठी गेले असता सचिन केंद्रे यांनी कै. श्रीदेवी यांची मुलगी *कु. विशाखा गव्हाणे* हिच्या शिक्षणाबाबत चौकशी केली. विशाखा सध्या उदगीर येथील *'इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस'* मध्ये प्रा. *सिद्धेश्वर पटणे* सरांकडे 12वीची खाजगी शिकवणी घेत असल्याचे समजले. आई-वडील दोघेही नसल्याचे समजताच सचिन केंद्रे यांनी तत्परतेने क्लासला भेट देऊन विशाखाची *संपूर्ण वार्षिक फी स्वतः जमा केली*. तसेच यापुढेही तिच्या शैक्षणिक व इतर खर्चासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी प्रा. सिद्धेश्वर पटणे यांनी देखील सामाजिक भान राखत विशाखाच्या फीमध्ये *मोठी सवलत* देऊन या उपक्रमास सहकार्य केले. यावेळी बोलताना सचिन केंद्रे म्हणाले, _"शिक्षण हाच समाज बदलण्याचा खरा मार्ग आहे. विशाखासारख्या हुशार मुलीचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये, यासाठी आम्ही नेहमीच तिच्या पाठीशी उभे राहू."_ सचिन केंद्रे यांच्या या कार्याचे डोंगर कोनाळी व परिसरातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. _"आजच्या काळात शब्दाला जागणारे आणि तळमळीने काम करणारे लोकप्रतिनिधी दुर्मिळ आहेत. सचिन केंद्रे यांच्यासारखे नेते समाजाला नक्कीच प्रेरणा देतील"_, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

Latur, Latur | Aug 5, 2026

MORE NEWS

"पैसे की बारिश" कराने के लिए अघोरी विधि का षड्यंत्र, 15 आरोपियों पर पॉक्सो और नरबलि कानून के तहत मामला दर्ज

_उदगीर, दि. 16:_ पैसे पाने के लिए अंधविश्वास में आकर नाबालिग लड़की का इस्तेमाल कर अघोरी विधि करने की कोशिश करने वाले गिरोह का उदगीर ग्रामीण पुलिस ने पर्दाफाश किया है। इस मामले में 4 राज्यों के 15 लोगों के खिलाफ केस दर्ज किया गया है।

16 अगस्त 2026 की सुबह 2 बजे लातूर-उदगीर रोड पर करडखेल फाटा के पास यह घटना हुई। पुलिस नाईक संतोष शिंदे की शिकायत पर उदगीर ग्रामीण पुलिस स्टेशन में गुनाह रजिस्टर नंबर 577/2026 दर्ज हुआ है।

आरोपियों ने मिलकर "लक्ष्मी पूजा" के नाम पर अंधविश्वासी विधि करने की योजना बनाई थी। इसके लिए महाराष्ट्र नरबलि और अघोरी प्रथा प्रतिबंधक अधिनियम 2013 की धारा 3(3) के साथ-साथ पॉक्सो कानून की धारा 12 और 18 लगाई गई हैं।

मामले में पीड़ित 15 वर्षीय लड़की आंध्र प्रदेश के श्रीकाकुलम जिले की रहने वाली है। आरोपियों में बीड, अकोला, परभणी, पुणे, तेलंगाना, आंध्र प्रदेश और कर्नाटक के मजदूर, ड्राइवर और व्यवसायी शामिल हैं।

इस मामले की जांच पुलिस निरीक्षक डी.डी. गाडे कर रहे हैं। पुलिस ने बताया कि समय पर कार्रवाई होने से एक बड़ी अनहोनी टल गई।

पुलिस ने नागरिकों से अपील की है कि वे किसी भी तरह के अंधविश्वास का शिकार न बनें।

"पैसे की बारिश" कराने के लिए अघोरी विधि का षड्यंत्र, 15 आरोपियों पर पॉक्सो और नरबलि कानून के तहत मामला दर्ज _उदगीर, दि. 16:_ पैसे पाने के लिए अंधविश्वास में आकर नाबालिग लड़की का इस्तेमाल कर अघोरी विधि करने की कोशिश करने वाले गिरोह का उदगीर ग्रामीण पुलिस ने पर्दाफाश किया है। इस मामले में 4 राज्यों के 15 लोगों के खिलाफ केस दर्ज किया गया है। 16 अगस्त 2026 की सुबह 2 बजे लातूर-उदगीर रोड पर करडखेल फाटा के पास यह घटना हुई। पुलिस नाईक संतोष शिंदे की शिकायत पर उदगीर ग्रामीण पुलिस स्टेशन में गुनाह रजिस्टर नंबर 577/2026 दर्ज हुआ है। आरोपियों ने मिलकर "लक्ष्मी पूजा" के नाम पर अंधविश्वासी विधि करने की योजना बनाई थी। इसके लिए महाराष्ट्र नरबलि और अघोरी प्रथा प्रतिबंधक अधिनियम 2013 की धारा 3(3) के साथ-साथ पॉक्सो कानून की धारा 12 और 18 लगाई गई हैं। मामले में पीड़ित 15 वर्षीय लड़की आंध्र प्रदेश के श्रीकाकुलम जिले की रहने वाली है। आरोपियों में बीड, अकोला, परभणी, पुणे, तेलंगाना, आंध्र प्रदेश और कर्नाटक के मजदूर, ड्राइवर और व्यवसायी शामिल हैं। इस मामले की जांच पुलिस निरीक्षक डी.डी. गाडे कर रहे हैं। पुलिस ने बताया कि समय पर कार्रवाई होने से एक बड़ी अनहोनी टल गई। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि वे किसी भी तरह के अंधविश्वास का शिकार न बनें।

Latur, Latur | Aug 16, 2026

भाजप युवा मोर्चा चे गांधी चौक यथे आंदोलन

भाजप युवा मोर्चा चे गांधी चौक यथे आंदोलन

Latur, Latur | Aug 16, 2026

लातूर : लातूर शहरातील खाद्यप्रेमींच्या पसंतीस उतरलेले संजय आईस बार व सुखसागर फास्ट फूड आता नव्या दिमाखात ‘सुखसागर फूड्स – व्हेज नॉनव्हेज’ या नावाने लातूरकरांच्या सेवेत सुरू झाले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी सुखसागर फूड्सचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
१९७५ मध्ये सुरू झालेल्या संजय आईस बार व सुखसागर फास्ट फूडच्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाला आता नव्या रूपाची जोड मिळाली आहे. पाच दशकांपासून लातूरकरांना आपल्या पदार्थांची चव आणि सेवा देणाऱ्या संजय धुमाळ यांनी आता व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांची विस्तृत मेजवानी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी सुखसागर फूड्सची सुरुवात केली आहे.
लातूर शहराची ओळख खवय्यांचे शहर म्हणून आहे. ‘जे जे नवं ते लातूरला हवं’ अशी लातूरची ओळख असताना, बदलत्या काळानुसार खाद्यप्रेमींच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. हीच गरज लक्षात घेऊन सुखसागर फूड्समध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसोबत अस्सल मराठमोळ्या चवीला विशेष स्थान देण्यात आले आहे.
संजय आईस बार आणि सुखसागर फास्ट फूडच्या माध्यमातून गेल्या ५० वर्षांत लातूरकरांशी निर्माण झालेला विश्वास आणि आपुलकी कायम ठेवत, त्याच चव आणि दर्जाच्या परंपरेला पुढे नेण्याचा प्रयत्न सुखसागर फूड्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या ग्राहकांसाठी परिचित चवीची आठवण आणि नव्या ग्राहकांसाठी नवे खाद्यआकर्षण, अशी दुहेरी मेजवानी येथे उपलब्ध होणार आहे.
आर्यन संजय धुमाळ यांच्या हस्ते फीत कापून सुखसागर फूड्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य याहिया कसेरी, नागेश आप्पा बावगे, रामेश्वरजी मालू, महेशजी सोमानी, शुभम दडगे, ओम तांदळे, ऋषिकेश हलगे, सोहम बुलशेटे यांच्यासह मित्रपरिवार, हितचिंतक आणि खाद्यप्रेमी उपस्थित होते.
पाच दशकांच्या खाद्यसेवेचा अनुभव, लातूरकरांचा विश्वास आणि व्हेज-नॉनव्हेज पदार्थांची नवी रेंज या जोरावर सुखसागर फूड्सने लातूरच्या खाद्यविश्वात नव्या रूपाने प्रवेश केला आहे. लातूरकरांच्या अस्सल चवीची भूक भागविण्यासाठी सुखसागर फूड्स किती लोकप्रिय ठरते, हे येणाऱ्या काळात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पत्ता : संजय आईस बार शेजारी, सुभाष चौक, रिगल टॉकीज, लातूर.

लातूर : लातूर शहरातील खाद्यप्रेमींच्या पसंतीस उतरलेले संजय आईस बार व सुखसागर फास्ट फूड आता नव्या दिमाखात ‘सुखसागर फूड्स – व्हेज नॉनव्हेज’ या नावाने लातूरकरांच्या सेवेत सुरू झाले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी सुखसागर फूड्सचे उद्घाटन उत्साहात पार पडले. १९७५ मध्ये सुरू झालेल्या संजय आईस बार व सुखसागर फास्ट फूडच्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाला आता नव्या रूपाची जोड मिळाली आहे. पाच दशकांपासून लातूरकरांना आपल्या पदार्थांची चव आणि सेवा देणाऱ्या संजय धुमाळ यांनी आता व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांची विस्तृत मेजवानी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी सुखसागर फूड्सची सुरुवात केली आहे. लातूर शहराची ओळख खवय्यांचे शहर म्हणून आहे. ‘जे जे नवं ते लातूरला हवं’ अशी लातूरची ओळख असताना, बदलत्या काळानुसार खाद्यप्रेमींच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. हीच गरज लक्षात घेऊन सुखसागर फूड्समध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसोबत अस्सल मराठमोळ्या चवीला विशेष स्थान देण्यात आले आहे. संजय आईस बार आणि सुखसागर फास्ट फूडच्या माध्यमातून गेल्या ५० वर्षांत लातूरकरांशी निर्माण झालेला विश्वास आणि आपुलकी कायम ठेवत, त्याच चव आणि दर्जाच्या परंपरेला पुढे नेण्याचा प्रयत्न सुखसागर फूड्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या ग्राहकांसाठी परिचित चवीची आठवण आणि नव्या ग्राहकांसाठी नवे खाद्यआकर्षण, अशी दुहेरी मेजवानी येथे उपलब्ध होणार आहे. आर्यन संजय धुमाळ यांच्या हस्ते फीत कापून सुखसागर फूड्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य याहिया कसेरी, नागेश आप्पा बावगे, रामेश्वरजी मालू, महेशजी सोमानी, शुभम दडगे, ओम तांदळे, ऋषिकेश हलगे, सोहम बुलशेटे यांच्यासह मित्रपरिवार, हितचिंतक आणि खाद्यप्रेमी उपस्थित होते. पाच दशकांच्या खाद्यसेवेचा अनुभव, लातूरकरांचा विश्वास आणि व्हेज-नॉनव्हेज पदार्थांची नवी रेंज या जोरावर सुखसागर फूड्सने लातूरच्या खाद्यविश्वात नव्या रूपाने प्रवेश केला आहे. लातूरकरांच्या अस्सल चवीची भूक भागविण्यासाठी सुखसागर फूड्स किती लोकप्रिय ठरते, हे येणाऱ्या काळात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पत्ता : संजय आईस बार शेजारी, सुभाष चौक, रिगल टॉकीज, लातूर.

Latur, Latur | Aug 16, 2026

📍गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने दिनेश शिवलाल गिरी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने केले सन्मानित

लातूर : राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींना माध्यमाच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडत, तसेच समाजातील सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत सातत्याने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले महाराष्ट्र न्यूजचे चीफ एडिटर दिनेश शिवलाल गिरी यांना गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पत्रकारिता हे केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील अन्याय, अत्याचार आणि समस्यांना वाचा फोडण्याचे प्रभावी माध्यम आहे, या भूमिकेतून दिनेश गिरी सातत्याने कार्यरत आहेत. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून अनेक विषयांना वाचा फोडली आहे.

त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आणि पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांनी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करून त्यांचा सन्मान केला. या पुरस्काराबद्दल दिनेश गिरी यांनी गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूरचे आभार मानले असून, भविष्यातही अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

📍गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने दिनेश शिवलाल गिरी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने केले सन्मानित लातूर : राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींना माध्यमाच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडत, तसेच समाजातील सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत सातत्याने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले महाराष्ट्र न्यूजचे चीफ एडिटर दिनेश शिवलाल गिरी यांना गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता हे केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील अन्याय, अत्याचार आणि समस्यांना वाचा फोडण्याचे प्रभावी माध्यम आहे, या भूमिकेतून दिनेश गिरी सातत्याने कार्यरत आहेत. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून अनेक विषयांना वाचा फोडली आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आणि पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांनी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करून त्यांचा सन्मान केला. या पुरस्काराबद्दल दिनेश गिरी यांनी गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूरचे आभार मानले असून, भविष्यातही अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Latur, Latur | Aug 16, 2026

📍दिनेश एस.गिरी चीफ एडिटर महाराष्ट्र न्यूज पोर्टल यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर.

गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने दिनेश एस. गिरी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांनी गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूरचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

हा पुरस्कार आज दि 16/8/2026 रोजी भालचंद्र ब्लड बँक सभागृह लातूर या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे.

समाजाच्या वतीने मिळालेला हा सन्मान आपल्यासाठी प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब असल्याचे दिनेश एस. गिरी यांनी यावेळी व्यक्त केले.

📍दिनेश एस.गिरी चीफ एडिटर महाराष्ट्र न्यूज पोर्टल यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर. गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने दिनेश एस. गिरी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांनी गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूरचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. हा पुरस्कार आज दि 16/8/2026 रोजी भालचंद्र ब्लड बँक सभागृह लातूर या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. समाजाच्या वतीने मिळालेला हा सन्मान आपल्यासाठी प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब असल्याचे दिनेश एस. गिरी यांनी यावेळी व्यक्त केले.

Latur, Latur | Aug 16, 2026