जालना: आरएसएसच्या नावाखाली फुले-शाहू-आंबेडकर विचारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न; डॉ. बाबासाहेबांविरोधात बोलणाऱ्यांना सोड
Jalna, Jalna | Aug 1, 2026 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जय भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरभाई निकाळजे यांनी सामाजिक, राजकीय आणि दलित समाजाच्या विविध प्रश्नांवर भाष्य करत महायुती सरकार आणि आरएसएसवर गंभीर आरोप केले. त्यांनी समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर ठाम राहण्याचे आवाहन केले. निकाळजे म्हणाले की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळ आज बंद पडण्याच्या स्थितीत आले आहे. यासाठी सरकारने नेमके काय केले, याचे उत्तर जनते