Public App Logo
Profile Picture

द महाराष्ट्र न्यूज

@dgiri8187
299Followers
0Following
भाजप युवा मोर्चा चे गांधी चौक यथे आंदोलन
📍शिरूर अनंतपाळच्या अभूतपूर्व यशानंतर उद्या देवणीत भरणार खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचा 'जनता दरबार'!*
*आ. अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार जिल्हाभर मोहिमेला वेग; सर्वसामान्यांचे प्रश्न जागेवरच सुटणार*

लातूर:
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद आ. अमित विलासराव देशमुख यांच्या विशेष सूचनेनुसार आणि लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांच्या पुढाकारातून, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचा संपूर्ण जिल्ह्यात 'जनता दरबार' आयोजित करण्यात येत आहे. या मोहिमेचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून उद्या, दिनांक १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता देवणी येथील तहसील कार्यालयात या 'जनता दरबारा'चे आयोजन करण्यात आले आहे.
शिरूर अनंतपाळमधील 'जनता दरबारा'चे घवघवीत यश
सर्वसामान्यांचे प्रशासकीय पातळीवर रखडलेले प्रश्न आणि अडीअडचणी लोकदरबारी तात्काळ सोडवण्याच्या उद्देशाने या महत्त्वपूर्ण मोहिमेची सुरुवात १६ जुलै रोजी शिरूर अनंतपाळ येथून करण्यात आली होती. तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खासदाराने थेट जनतेच्या बांधावर येऊन दरबार घेतल्याने, तेथे नागरिकांचा अभूतपूर्व महापूर लोटला होता.
या पहिल्या दरबारात खा. डॉ. शिवाजी काळगे यांनी अत्यंत आत्मीयतेने नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले होते. महसुली अडचणी, शेतीचे प्रश्न आणि वैयक्तिक तक्रारींवर त्यांनी थेट तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारत, "सामान्य माणसाला हेलपाटे मारायला लावू नका, त्यांचे प्रश्न नियमानुसार त्वरित मार्गी लावा," असे सक्त निर्देश जागेवरच दिले. यामुळे अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फुटली आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या दरबाराला काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासकीय लालफितीला चाप आणि जनतेला दिलासा
लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे अनेक प्रश्न प्रशासकीय पातळीवर लालफितीत अडकून पडतात. तळागाळातील माणसाला न्याय मिळावा आणि सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना खेटे मारावे लागू नयेत, या उदात्त विचारातून आ. अमित देशमुख यांनी संपूर्ण जिल्ह्यात 'जनता दरबार' घेण्याची संकल्पना मांडली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांच्या कुशल नियोजनातून ही मोहीम आता संपूर्ण जिल्हाभर अधिक ताकदीने राबवली जात आहे.
नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
देवणी आणि परिसरातील नागरिकांचे प्रशासकीय पातळीवरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी उद्याचा हा 'जनता दरबार' एक मोठी संधी ठरणार आहे. आ. अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे देवणी तालुक्यातील जनतेलाही मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उद्या, १७ ऑगस्ट रोजी देवणी तहसील कार्यालयात होणाऱ्या या जनता दरबारात परिसरातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि महिलांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एका अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
लातूर : लातूर शहरातील खाद्यप्रेमींच्या पसंतीस उतरलेले संजय आईस बार व सुखसागर फास्ट फूड आता नव्या दिमाखात ‘सुखसागर फूड्स – व्हेज नॉनव्हेज’ या नावाने लातूरकरांच्या सेवेत सुरू झाले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी सुखसागर फूड्सचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
१९७५ मध्ये सुरू झालेल्या संजय आईस बार व सुखसागर फास्ट फूडच्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाला आता नव्या रूपाची जोड मिळाली आहे. पाच दशकांपासून लातूरकरांना आपल्या पदार्थांची चव आणि सेवा देणाऱ्या संजय धुमाळ यांनी आता व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांची विस्तृत मेजवानी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी सुखसागर फूड्सची सुरुवात केली आहे.
लातूर शहराची ओळख खवय्यांचे शहर म्हणून आहे. ‘जे जे नवं ते लातूरला हवं’ अशी लातूरची ओळख असताना, बदलत्या काळानुसार खाद्यप्रेमींच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. हीच गरज लक्षात घेऊन सुखसागर फूड्समध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसोबत अस्सल मराठमोळ्या चवीला विशेष स्थान देण्यात आले आहे.
संजय आईस बार आणि सुखसागर फास्ट फूडच्या माध्यमातून गेल्या ५० वर्षांत लातूरकरांशी निर्माण झालेला विश्वास आणि आपुलकी कायम ठेवत, त्याच चव आणि दर्जाच्या परंपरेला पुढे नेण्याचा प्रयत्न सुखसागर फूड्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या ग्राहकांसाठी परिचित चवीची आठवण आणि नव्या ग्राहकांसाठी नवे खाद्यआकर्षण, अशी दुहेरी मेजवानी येथे उपलब्ध होणार आहे.
आर्यन संजय धुमाळ यांच्या हस्ते फीत कापून सुखसागर फूड्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य याहिया कसेरी, नागेश आप्पा बावगे, रामेश्वरजी मालू, महेशजी सोमानी, शुभम दडगे, ओम तांदळे, ऋषिकेश हलगे, सोहम बुलशेटे यांच्यासह मित्रपरिवार, हितचिंतक आणि खाद्यप्रेमी उपस्थित होते.
पाच दशकांच्या खाद्यसेवेचा अनुभव, लातूरकरांचा विश्वास आणि व्हेज-नॉनव्हेज पदार्थांची नवी रेंज या जोरावर सुखसागर फूड्सने लातूरच्या खाद्यविश्वात नव्या रूपाने प्रवेश केला आहे. लातूरकरांच्या अस्सल चवीची भूक भागविण्यासाठी सुखसागर फूड्स किती लोकप्रिय ठरते, हे येणाऱ्या काळात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पत्ता : संजय आईस बार शेजारी, सुभाष चौक, रिगल टॉकीज, लातूर.
📍गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने दिनेश शिवलाल गिरी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने केले सन्मानित

लातूर : राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींना माध्यमाच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडत, तसेच समाजातील सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत सातत्याने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले महाराष्ट्र न्यूजचे चीफ एडिटर दिनेश शिवलाल गिरी यांना गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पत्रकारिता हे केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील अन्याय, अत्याचार आणि समस्यांना वाचा फोडण्याचे प्रभावी माध्यम आहे, या भूमिकेतून दिनेश गिरी सातत्याने कार्यरत आहेत. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून अनेक विषयांना वाचा फोडली आहे.

त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आणि पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांनी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करून त्यांचा सन्मान केला. या पुरस्काराबद्दल दिनेश गिरी यांनी गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूरचे आभार मानले असून, भविष्यातही अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
📍दिनेश एस.गिरी चीफ एडिटर महाराष्ट्र न्यूज पोर्टल यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर.

गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने दिनेश एस. गिरी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांनी गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूरचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

हा पुरस्कार आज दि 16/8/2026 रोजी भालचंद्र ब्लड बँक सभागृह लातूर या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे.

समाजाच्या वतीने मिळालेला हा सन्मान आपल्यासाठी प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब असल्याचे दिनेश एस. गिरी यांनी यावेळी व्यक्त केले.
📍डॉ. राजेश दरडे यांच्या वैष्णवी हॉस्पिटलमध्ये प्रस्तुतीदरम्यान उषा कलमे या ३३ वर्षीय महिलेचा दुर्दैव मृत्यू
📍शुद्धता आणि विश्वासाची परंपरा किर्ती गोल्ड.

 किर्ती गोल्ड परिवाराच्या वतीने देशाच्या 80व्या स्वतंत्र दिनानिमित्त लातूरकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा <nis:link nis:type=tag nis:id=kirtigold nis:value=kirtigold nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=फेसबुक nis:value=फेसबुक nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=vairalpost nis:value=vairalpost nis:enabled=true nis:link/>
📍नुतन नगरपरिषद इमारतीच्या लिफ्ट साठी सोडलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साठलेले आणि त्या पाण्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या सकाळीच एक मृतदेह आढळला 
📍अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास सुरू केलेला आहे. 
📍मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट पोलिसांसह फॉरेन्सिक  टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरु.
📍मुरुड च्या शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर आणले कोर्टातून जप्ती चे आदेश
📍लातूर तिरंगा रॅली - राष्ट्र भक्ती चा जागर <nis:link nis:type=tag nis:id=tirangarally nis:value=TirangaRally nis:enabled=true nis:link/> 
 <nis:link nis:type=tag nis:id=tiranga nis:value=tiranga nis:enabled=true nis:link/>
लातुर ची भव्य तिरंगा रॅली,
राष्ट्रभक्ती चा भव्य जागर.
📍स्वर्गीय विलासराव देशमूख यांच्या 14व्या स्मृतिदिनां निमित्त बाभळगाव येथे अभिवादनां साठी लोटला जनसागर.
📍साहेब या शब्दाने लातूर करांचं हित जोपसलं होत, 
आज ही आपल्या साहेबांच्या आठवणी मनात जोपसणारा लातूरकर दरवर्षी बाभळगाव ला न चुकता येतो आज ही त्यांच्या ऋणात राहू इच्छितो साहेब आज नाहीत हे आज ही मनाला मान्य होत नाही, अशा आभाळा एवढं लातूर करांवर प्रेम करणाऱ्या साहेबनां आज ही विनम्र पणे अभिवादन करतो लातूरकर💐 🙏🏻
📍 लातूरकरांनी काँग्रेसला भरभरून दिलं पण काँग्रेसने लातूरकरांना फक्त धोका दिला.
📍 खऱ्या अर्थाने काँग्रेस ने स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा अपमानच केल्या ची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
📍स्वर्गीय विलासराव देशमुख मार्गा लगत असलेल्या महापौरांच्या प्रभाग12 च्या नागरिकांची व्यथा ऐकणार तरी कोण.

📍स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा अपमान करू नका 
 स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब ग्रेट होते - प्रभाग 12 चा सामान्य नागरिक.
📍 लातूर तालुक्यातील हरंगुळ बुद्रुक च्या गावकऱ्यांचे लातूर जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण.
📍 बार्शी रोड वरती अवैध रित्या हातभट्टी विक्री, बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री, त्यावर कहर म्हणजे मुख्य रस्त्यापासून 100 फुटावरती वेश्याव्यवसाय, एमआयडीसीतील सोडण्यात आलेल्या घाण पाण्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असतानाही हे प्रशासन कुंभकरणाच्या झोपेत.
📍 गावातील विविध समस्यांच्या पाठपुरावा करून वैतागलेल्या नागरिकांनी हतबल होऊन आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सामूहिक रित्या आत्मदहन करु असा इशाराही दिला. Part 2
Video 15
लातुरात शहर भाजप च्या वतीनी भव्य तिरंगा रॅली चे आयोजन
📍 नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपीचे क्लासेस बंद करा म्हणत लातूरचे सतीश कारंडे अमरण उपोषणावर 
📍 क्लासेस अद्याप बंद झालेले नाहीत प्रशासना प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करते की काय असा संशय सतीश कारंडे यांनी व्यक्त केला आहे.
📍 एखाद्या पान टपरीवर दोन पुड्या गुटक्याच्या सापडल्या तर पोलीस प्रशासन तात्काळ त्याची पानाची टपरी सील करत बंद करत त्याला अटक करतं, मग नीट पेपर प्रकरणातील आरोपी असलेल्या लातूरच्या आरसीसी क्लासेस च्या संचालकाला अटक झाली मात्र क्लासेस अजूनही कोणाच्या कृपेने चालतायेत हे गमक अजून जनतेला कळलेले नाही कदाचित तो पैसेवाला आहे म्हणून त्याची क्लासेस अजून सुरू आहेत की काय असा अहवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
📍 क्लासेस बंद करण्यात हे प्रशासन हातबल ठरलेलं आहे - सतीश कारंडे.
📍 लातूर तालुक्यातील हरंगुळ बुद्रुक च्या गावकऱ्यांचे लातूर जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण.
📍 बार्शी रोड वरती अवैध रित्या हातभट्टी विक्री, बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री, त्यावर कहर म्हणजे मुख्य रस्त्यापासून 100 फुटावरती वेश्याव्यवसाय, एमआयडीसीतील सोडण्यात आलेल्या घाण पाण्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असतानाही हे प्रशासन कुंभकरणाच्या झोपेत.
📍स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या सारखं देशा ला दिशा देणार कार्य आजच्या कोणत्याही नेत्याला जमन अश्यक्य
🇮🇳 ‘हर घर तिरंगा’ अभियान – भव्य तिरंगा रॅली! 

स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षाकडे (२०४७) वाटचाल करताना, स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना देण्यासाठी आणि हातात तिरंगा घेऊन राष्ट्रभक्तीचा जागर करण्यासाठी लातूर येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

📍भव्य तिरंगा रॅली 
📅 दिनांक : १३ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सकाळी १० वा.

📍 रॅलीचा मार्ग :
देशीकेंद्र विद्यालय → लोकमान्य टिळक चौक → गांधी चौक → हनुमान चौक → गंज गोलाई

लातूर शहरातील सर्व नागरिकांनी, युवकांनी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आणि राष्ट्रप्रेमींनी या भव्य तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याची नम्र विनंती अजित पाटील कव्हेकर भाजपा जिल्हा अध्यक्ष यांनी केली आहे.
📍मराठवाड्याच्या विकासाला नवे इंजिन; कलबुर्गी–लातूर रेल्वे प्रकल्प पुढे सरकला

₹4,917 कोटींच्या कलबुर्गी–लातूर रेल्वे प्रकल्पाला वेग; राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

कलबुर्गी–लातूर रेल्वेमार्गासाठी निर्णायक हालचाल; महाराष्ट्राच्या सहमतीची प्रतीक्षा

लातूरकरांसाठी दिलासादायक बातमी; नवीन रेल्वेमार्गासाठी मध्य रेल्वेचा प्रस्ताव

लातूर | प्रतिनिधी

लातूर व मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या कलबुर्गी–लातूर नवीन ब्रॉडगेज विद्युतीकृत रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी (बांधकाम) 16 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून प्रकल्पासाठी राज्य सरकारने 50 टक्के खर्च उचलण्यास सहमती द्यावी, अशी विनंती केली आहे.

या प्रकल्पाची एकूण लांबी 157.82 किलोमीटर असून त्यापैकी 96.82 किलोमीटर मार्ग महाराष्ट्रात येतो. या रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला असून प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹4,917 कोटी आहे.

सध्या कलबुर्गी आणि लातूर हे रेल्वेमार्गाने सुमारे 345 किलोमीटरच्या वळणावरील मार्गाने जोडलेले आहेत. नवीन मार्ग उभारल्यानंतर दोन्ही शहरांदरम्यान थेट रेल्वे संपर्क निर्माण होणार असून प्रवासाचे अंतर व वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

प्रस्तावित रेल्वेमार्ग धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातून जाणार असल्याने या भागातील उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे स्पष्ट केले असले, तरी आर्थिक परतावा अपेक्षित निकषांपेक्षा कमी असल्याने राज्य सरकारच्या आर्थिक सहभागाची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारची सहमती मिळाल्यानंतर प्रकल्प मंजुरीसाठी पुढील प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=latur nis:value=Latur nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kalaburagi nis:value=Kalaburagi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturrailway nis:value=LaturRailway nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=newrailwayline nis:value=NewRailwayLine nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=centralrailway nis:value=CentralRailway nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=railwayproject nis:value=RailwayProject nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=marathwada nis:value=Marathwada nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dharashiv nis:value=Dharashiv nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ausa nis:value=Ausa nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=development nis:value=Development nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=infrastructure nis:value=Infrastructure nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtra nis:value=Maharashtra nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturlive nis:value=LaturLive nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=facebookviral nis:value=facebookviral nis:enabled=true nis:link/>
📍उघडा डोळे बघा नीट - झारखंड च्या विध्यार्थी आंदोलना बाबत का काँग्रेसचा दुटप्पीपणा..?
📍एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन लातूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

लातूर : शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन लातूर जिल्ह्यातील देवणी, शिरोळ, वांजरवाडा यासह विविध भागांतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी शासकीय विश्रामगृह, लातूर येथे हा प्रवेश सोहळा पार पडला.

देवणी येथील देविदास लक्ष्मण कांबळे, बंडाप्पा होनमाने, शिरोळ-वांजरवाडा येथील शिवाजीराव मोरे, सविता जाधव, कमल गोडबोले, पल्लवी रासुरे, सविता ऐतनबोणे, सत्यकला मोरे, कलावती मलकापूरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की, एकनाथराव शिंदे हे अहोरात्र मेहनत घेऊन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लाडकी बहीण योजना, शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार, कर्मचारी, युवक-युवती यांच्यासह समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

महाराष्ट्रात एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर प्रवेश करीत आहेत. लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याचा आनंद असून, सर्वांनी एकत्रितपणे शिवसेना मजबूत करण्यासाठी काम करावे, असे आवाहन माने यांनी केले.

“ज्या ठिकाणी माझी गरज भासेल, कोणतीही अडचण निर्माण झाली तर जिल्हाप्रमुख म्हणून अर्ध्या रात्रीही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन,” अशी ग्वाही शिवाजीराव माने यांनी यावेळी दिली.

येत्या काळात एकनाथराव शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा व्यक्त करत, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आवाहनही माने यांनी केले. ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ या संकल्पनेनुसार लातूर जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सरचिटणीस व्यंकटराव बिराजदार, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे, व्यापारी आघाडी सेनेचे जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरुळे, निलंगा विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख सोमनाथ स्वामी, मुरलीधर शिंदे, अॅड. वर्षाताई शिंदे, पूजाताई सगर, बबीता ताई कोरके, संजना नेटोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ स्वामी यांनी केले, तर प्रास्ताविक व्यंकटराव बिराजदार यांनी केले.
📍 विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त 15 ऑगस्ट ला लातूर मध्ये रंगणार स्वर विलास संगीत दरबार